व्यसनी व्यक्ती सामाजिकदृष्ट्या गैरवर्तन करत असतील, हिंसक बनत असतील, बेहोश होत असतील तरच त्यांना उपचार द्यावेत.
सातत्याने मद्यपान करुनही तोल जात नसल्यास व्यक्तीला उपचारांची गरज नाही.
अंमली पदार्थांचे सेवन करणारी व्यक्ती कार्यरत असेल आणि बर्यापैकी पैसे मिळवत असेल तर तिच्या प्रश्नात हस्तक्षेपाची गरज नाही. तिला उपचारांची गरज नाही.
होळी आणि रंगपंचमीसारख्या सणांच्या निमित्ताने दारु, भांग इ. चा वापर होत असतो. त्यामुळे अशा वेळी या पदार्थांचे सेवन करण्यात काहीच वावगे नाही.
मद्यसेवनामुळे भूक आणि लैंगिक क्षमता यात वाढ होते. सिगारेट, दारु यांच्या वापराची सध्या फॅशन आहे. त्यांच्या वापराने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. किंबहुना त्यांचा वापर म्हणजे व्यावसायिक / सामाजिक संकेतांचा एक भागच होय.